ठाणे : स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळ,पावस रत्नागिरी यांच्या माध्यमातून श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी पारायण २२ ते २८ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी २ ते सांयकाळी ६ पर्यंत ज्ञानेश्वर मंदिर पाचपाखाडी,ठाणे म्युनिसिपल ऑफिसच्या मागे आयोजित करण्यात आले आहे. __ सुमारे ७२५ वर्षापूर्वी संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांनह लिहिलेल्या श्रीज्ञानेश्वरी ह्या ग्रंथाची त्याकाळची प्राकृत भाषा आज समजणे अवघड झाले आहे.रत्नागिरी जवळील पावस येथील साक्षात्कारी संत स्वामी स्वरुपानंद महाराज यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन या मूळ ग्रंथाचा समजण्यास सोप्या मराठी भाषेत ओविबध्द अनुवाद केला.