मुख्यमंत्र्यांनी केले महापालिका राबवित असलेल्या विकासकामांचे कौतुक
ठाणे, ता. ०६ : ठाणे आणि शिवसेना हे अतूट नाते असून ठाण्याचा विकास बघितल्यानंतर अभिमानाने ऊर भरुन येतो. ठाण्याचा विकास हा इतर शहरांना निश्चीतच आदर्श ठरणारा असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज ठाणे महापालिकेच्या माध्यमातून प्रस्तावित केलेल्या विविध नागरी विकास कामांचा ई- भूमीपूजन सोह्ळ्याच्या वेळी काढले. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आदी मानयवर उपस्थीत होते.
महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास खासदार सर्वश्री राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, माजी आमदार सुभाष भोईर, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, शिवसेना उपनेते अनंत तरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हा धिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुकत विवेक फणसळकर, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, समीर उन्हाळे, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, मनीष जोशी, ओमप्रकाश दिवटे यांच्यासह सर्व समित्याचे सभापती, सर्वपक्षीय नगरसेवक, माजी महापौर, माजी उपमहापौर व महापालिका अधिकारी कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थीत होते.
ठाण्याच्या वैभवात भर टाकणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तीनहातनाका येथील भव्य स्मारकाचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाले. महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या स्मारकात शिवसेनाप्रमुखांचा संपूर्ण इतिहास व जीवनप्रवासाची सर्वसमावेशक माहिती ठाण्यासह देशातील तरूण व भावी पिढीला कायमस्वरुपी उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे, त्यांचा जीवनप्रवास, त्यांचे वैयकतीक व प्रासंगिक फोटो, त्यांची गाजलेली भाषणे, पुस्तके व भाषणाच्या सीडीज आदींचा संग्रह ठेवण्यात आला आहे. महापालिकेने राबविलेल्या या उपक्रमाचे भरभरुन कौतुक यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
ठाण्यातील मंजूर कल्सटर योजनेतंर्गत किसननगर येथील पहिल्या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून आपला जीव मुठीत धरुन जीवन जगत असलेल्या नागरिकांना सुटकेचा विश्वास मिळाला असून सर्व सोईनीयुक्त असे मालकीचे घर मिळणार आहे, गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेच्या माध्मयातून या योजनेचा पाठपुरावा होत असून याबाबतचे पहिले निवेदन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिले होते व त्याच योजनेचे भूमीपूजन मुख्यमंत्री म्हणून मला करता आले याचे सर्व श्रेय नागरिकांचे असल्याचेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नमूद केले.
तद्नंतर महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या 'ग्लोबल इम्पॅक्ट हबचे ई – उद्घाटन' व 'संकेतस्थळाचे अनावरण', कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर, 'खाडी किनारा विकास प्रकल्प, 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना', 'घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकलप, 'शहरी वनीकरण प्रकल्प' तसेच 'विज्ञान केंद्र प्रकल्प आदी प्रकल्पांचे ई- भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्र्याच्या हस्ते संपन्न झाला. तर ठाणे शहराच्या विकासाचा आढावा घेणाऱ्या 'पथदर्शी विकासाचे ठाणे' या कॉफीटेबलचे प्रकाशनही करण्यात आले.
यावेळी महापालिका क्षेत्रातील दिव्यांगाना बीएसयूपी योजनेतंर्गत 'सदनिका व रोजगारासाठी 'स्टॉलचे वाटप' करण्यात आले. अनाथ, निराधार, निरश्रीत बालके तसेच एचआयव्हीबाधित पालकांची मुले यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदतीची तरतूद असलेल्या योजनेतील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात 'अनुदान वाटप' करण्यात आले. तर लाडकी लेक योजनेतंर्गत प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्र्याच्या हस्ते अनुदानाचे वाटप करण्यात आले. ठाण्याच्या विकासात सर्वांचेच योगदान असून यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्र्याच्या हस्ते महापौर संजीव जयस्वाल, महापौर नरेश म्हस्के व माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी ठाण्याच्या विकासासाठी जे - जे आवश्यक आहे ते मी मुख्यमंत्री म्हणून निश्चीतच सर्व मागण्या पूर्ण करणार असल्याचे सांगत चतुर्थ श्रेणी कर्मचारी व पोलीसांसाठी १० टक्के सदनिका नवीन गृहनिर्माण प्रकल्पामध्ये राखीव ठेवण्याबाबतच्या सूचना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्रयांनी केल्या. तर एमएमआर अंतर्गत येणाऱ्या इमारतींचाही पुनर्विकास करणेबाबत कार्यवाही केली जाईल असेही सुतोवाच मुख्यमंत्री यांनी यावेळी केले.
यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ठाण्याच्या विकासाचा धावता आढावा घेतला. महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ठाण्यात प्रथमच आलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे स्वागत केले. तर मुख्यमंत्र्याच्या कारकीर्दीत ठाणे महापालिकेचे शासन दरबारी प्रलंबीत असलेले विषय मार्गी लागतील असा विश्वास व्यकत करीत रोजगारनिर्मितीसाठी ठाणे शहराला विविध प्रकल्प देण्याची मागणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त २ समीर उन्हाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.